• Total Visitor ( 449657 )
News photo

मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!

Raju tapal August 19, 2025 88

समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ - ५० किमी;

मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!



मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ ते ५० किमी राहणार असून तो प्रती ताशी ६५ कि.मी.पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.



भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर १८ ते २२ ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीदरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ ते ५० कि.मी. राहणार असून तो प्रती ताशी ६५ कि.मी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे. या कालावधीत वित्त व जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक यांना याबाबत सूचित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.



कुठे रेड अलर्ट ? कुठे ऑरेंज अलर्ट ?



रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा घाट परिसरात अतिमुसळधार ते अतिवृष्टीची (ऑरेंज अलर्ट) शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement