केळवाडी येथे विजेच्या धक्क्याने चार जनावर ठार
केळवाडी येथे विजेच्या धक्क्याने चार जनावरे ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.
अतिदुर्गम भागातील वाडीवरहे केळवाडी येथील आदिवासी शेतकरी गोविंद तुका खाकर यांचे शुक्रवारी दुपारी जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात असताना अचानक विजेच्या धक्क्याने चार बैल जागीच ठार झाले असून पंचनामा साठी अजून पर्यंत कोणी आलं नसल्याचे स्पष्ट होत आहेत. या गरीब शेतकरी यांना मदत मिळाली पाहिजे असे आवाहन पत्रकार वेल्फेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांनी केले आहे.
मुरबाड प्रतिनिधी
राजेश भांगे मुरबाड