• Total Visitor ( 435878 )
News photo

यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के, कोकण विभागाची बाजी

Raju tapal May 05, 2025 66

बारावीचा निकाल जाहीर !

यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के, 

कोकण विभागाची बाजी



जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?



बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली आहे हे जाहीर करण्यात आले आहे.यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.



नऊ विभागीय मंडळाचा निकाल



पुणे ९१.३२



नागपूर ९०.५२



छत्रपती संभाजीनगर ९२.२४



मुंबई ९२.९३



कोल्हापूर ९३.६४



अमरावती ९१.४३



नाशिक ९१.३१



लातूर ८९.४६



कोकण ९६.७४



कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.



गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे.



कोणत्या शाखेची किती टक्केवारी?



विज्ञान- ९७.३५



कला- ८०.५२



वाणिज्य- ९२.६८



व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३



आयटीआय- ८२.०३



बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement