कल्याण मध्ये मिर्गी (एपिलेप्सी) आजारावर मोफत आरोग्य शिबिर
( डॉ. जितेंद्र पाटील यांचे यशस्वी संशोधन )
कल्याण :- मिर्गी किंवा फिट येणे (एपिलेप्सी) ही समस्या खूप झपाट्याने वाढत चाललेली आहे मिर्गी किंवा फिट येण्याआधी व्यक्तीला डोके दुखणे, एकटक बघत राहणे, मिर्गी आल्यानंतर हात पायांना आकडी येणे, हातपाय वाकडे तिकडे होणे ,नजर फिरवणे ,बेशुद्ध होणे, शुद्धीवर आल्यानंतर कोणत्याही गोष्टीची आठवण न राहणे इत्यादी लक्षणे आढळतात.
डॉ. जितेंद्र पाटील (आयुर्वेदाचार्य) लाईफ मॅनेजमेंट हॉस्पिटल कल्याण यांनी मिर्गी आजारावर २० वर्षापासून अथक संशोधन करून यशस्वी औषधोपचार शोधून काढलेला आहे. त्यामुळे मिर्गी हा आजार कायमचा ठीक होऊ शकतो आणि मिर्गी रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात, जनसामान्यांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी व मिर्गी रोगमुक्त भारत हे त्यांचे ध्येय आहे. मिर्गी रुग्णांसाठी डॉ. जितेंद्र पाटील मोफत आरोग्य शिबिर आयोजन करत आहेत,त्यामुळे मिर्गी रुग्णांसाठी एक आशेचा किरण आणि नवीन जीवनाची सुखद पर्वणी घेऊन आलेले आहेत. मिर्गी आजारातून प्रत्येक रुग्ण असह्य त्रासातून कायमचा बरा व्हावा यासाठी ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये प्रथमच
रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी, सकाळी १० ते ३ वेळात,डॉ. जितेंद्र पाटील, Epilepsy Neuro Clinic, विघ्नहर संकुल, गोदरेज फर्निचर जवळ भोईरवाडी बस स्टॉप, बिर्ला कॉलेज रोड कल्याण वेस्ट येथे आयोजित केले आहे, नाव नोंदणी साठी 9372089327 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता, व या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊ शकता असे आवाहन आयुर्वेदाचार्य डॉ. जितेंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.