“वृक्षहत्या थांबवा;अन्यथा शहरं राहणार नाहीत!”
मुंबई :- ठाण्यात गृहनिर्माण प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘नियोजनबद्ध वृक्षहत्या’विरोधात पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाढते तापमान,प्रदूषण आणि पूरस्थिती रोखण्यासाठी ‘Tree-Centric Design’ सक्तीचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.