अखेर भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली;
'या' दिवशी होणार पहिला हल्ला
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे.हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात येत आहे. तर भारताकडूनही सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यात आला आहे. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण या सर्व गोष्टींही ट्रेलरच्या स्वरूपात पाहिल्या जात आहे. पण भारताकडून पाकिस्तानवर अजून कोणताही मोठा हल्ला झालेला नाही. पण पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या हाती चावी सोपवली आहे. भारताचा आक्रमक दृष्टिकोन आणि पाकिस्तानच्या कृती पाहता युद्ध निश्चित मानले जाते.
भारताची तयारी पाहता भारत पाकिस्तानवर हल्ला कऱण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानात बसलेल्या लोकांनाही हे माहित आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलिकडेच हे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, रशियातील विजय दिनानंतर भारत कदाचित १०-११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करेल.
रशिया ९ मे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे त्यांनी ही भेट रद्द केल्याचे मानले जाते. त्यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाणार होते, पण तेही जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जाही संरक्षण सचिवांच्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अब्दुल बासित यांच्या विधानाव्यतिरिक्त, भारताच्या तयारीवरून असेही सूचित होते की भारत १० किंवा ११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. प्रत्यक्षात, ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. यामध्ये नागरिकांना युद्धादरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. लोकांना जागरूक केले जाईल. या सरावादरम्यान सायरन देखील वाजवला जाईल आणि १९७१ नंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे.
भारत कधीही काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लष्करी हल्ला करू शकतो, अशी भिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वर्तवली आहे. तसेच, नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल, असही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी अशा प्रकारची मॉक ड्रिल शेवटची आयोजित करण्यात आली होती. ही ड्रिल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आणि ३ डिसेंबर रोजी युद्ध सुरू झाले.
मॉक ड्रिलपूर्वी, हवाई दलाने उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर एक सराव सराव केला, ज्यामध्ये लढाऊ विमानांनी त्यांची ताकद दाखवली. गेल्या शुक्रवारी, हवाई दलाने एक्सप्रेसवेवर दोन टप्प्यात अभूतपूर्व लष्करी सराव केला. यामध्ये, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उड्डाण, लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरील फ्लाय-पास्ट यासारख्या लढाऊ तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रात्री ९ ते १० च्या दरम्यान झालेले रात्रीचे लँडिंग हे सरावाचे मुख्य आकर्षण होते आणि भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक क्षमता सिद्ध करून दाखवल्या.