राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार
कोकण,कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई - राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातील पावसाने ओढ दिला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात पावसाची तूट असताना जुलै महिन्यात पाऊस सक्रीय झाला आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातील दोन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा आँरेंज अलर्ट आहे.