आता शाळेत पोषण पखवाडा साजरा करण्याचे आदेश
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, २०२५ या महिन्यामध्ये दि. ०८ एप्रिल, २०२५ ते २५ एप्रिल, २०२५ या कालावधीमध्ये पोषण पखवाडा
शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे आदेश
अमरावती :- पोषण अभियान (राष्ट्रीय पोषण अभियान) अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारत सरकारने दि. ८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ हा कालावधी पोषण पखवाडा म्हणून घोषित केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि देशभरात आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे. पोषण पखवाडा २०२५ साजरा करण्यासाठी शाळा किंवा शैक्षणिक संस्थांकडून राबवता येणाऱ्या उपक्रमांची यादी खरोखरच प्रेरणादायी आहे. याच अनुषंगाने, संपूर्ण उपक्रमाचा सारांश व उपक्रमांची यादी अधिक स्पष्टपणे आणि आकर्षकपणे सादर करण्यासाठी एक रूपरेषा तयार केली आहे, त्याचा शाळा किंवा संस्थेच्या स्तरावर वापरता येईल. कालावधीः ८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ हा उपक्रम राबविण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्टः पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती, निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण २.० अंतर्गत SBCC (Social & Behaviour Chagne Communitation)
धोरणांची अंमलबजावणी
शाळांमध्ये राबविण्यासाठी सुचवलेले उपक्रमः
१) जागरूकता कार्यक्रमः
संतुलित आहार, पोषण, आरोग्य याविषयी संवादात्मक व्याख्याने व चर्चासत्रे,तज्ञ व्याख्याते, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन,कार्यशाळा व चर्चासत्रे
२.पोषण साक्षरता मोहिमा: शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोस्टर्स, स्किट्स, व्हिडिओ तयार करणार,पोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार व प्रसारित करणे,DIY DIY (Do it Yourself) / स्वदेशी खेळण्यांचा मेळावा
३ TOYathon कार्यशाळा:
अंगणवाडी सेविकांबरोबर DIY (Do it Yourself) उपलब्ध वस्तु व साहित्यापासून खेळणी बनवण्याच्या कार्यशाळा
लोककला व पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर
४) स्पर्धा आणि कार्यक्रमः
चित्रकला, निबंध लेखन, भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धा
"पोषण नायक/नायिका" निवड,विद्यार्थ्यांच्या सहभागातून सर्जनशीलता वाढवणे
५.पालकांचा सहभागः
SMC (School Management Committee) बैठका
कुटुंबातील खाण्याच्या सवयी, पौष्टिक आहार यावर चर्चा,घरचे आरोग्यदूत संकल्पना.
६) पारंपारिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन द्याःशाळांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक अन्न (श्रीअन्न- तृणधान्य) आणि स्थानिक कृषी पद्धती (SNGS मध्ये तसेच परसबागेतील विविध भाजीपाला व याबद्दल शिकण्यास प्रोत्साहित करावे.स्थानिक स्तरावरील उपलब्ध होणाऱ्या अन्नाचे पौष्टिक मूल्य अधोरेखित करणाऱ्या माहितीचे आदान-प्रदान चर्चा सत्रांद्वारे केले जाऊ शकते.
७) आरोग्य आणि स्वच्छता जागरूकताः
पोषण पखवाड्याचा एक प्रमुख घटक म्हणजे अन्न तयार करणे, साठवणूक करणे आणि सेवन करणे इत्यादींमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल संवेदनशील करणे.जिल्ह्यातील सर्व शाळांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत तसेच योग्य पोषणाचा संदेश आणि त्याचा एकूण विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात यावे. पोषण पखवाडा या काळात शाळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्यात यावा यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती, सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबींचा समावेश करण्यात येऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा.वरील विषयांबाबत आवश्यक ते सनियंत्रण शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावयाचे आहे. पोषण पखवाडा दरम्यान क्षेत्रीयस्तरावरील विविध अधिकाऱ्यांना शाळांमधून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणे बाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत.असे आदेश शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहे.
सध्दा सर्व शाळेत संकलीत चाचणी २सुरु झाली आहे.उन्हाचा पारा वाढत आहे.विद्यार्थांनी परीक्षेची तयारी करावी की अश्या उपक्रमात सहभाग घ्यावा.संध्दा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर विविध उपक्रमाचा भार आहे.आॅनलाईन माहीती,नवभारत साक्षरता,निपृन भारत उपक्रम,नवगतांचे स्वागत,मेळावे,शिक्षण परीषदा याचा भार पडत आहे.परीक्षेचा निकाल तयार करणे,जे काही उपक्रम नविन शैक्षणिक सञा पासुन राबवावे अशी विनंती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी केली आहे.