• Total Visitor ( 604488 )

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर - ८९. ७९ टक्के निकाल

Raju Tapal publisher May 02, 2026 27

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर - ८९. ७९ टक्के निकाल



कोकण विभाग अव्वल



लातूरचा निकाल सर्वात कमी



राज्यात मुलींनी मारली बाजी



पुणे:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून,दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा राज्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. राज्यात एकूण 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के निकाल लागला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement