• Total Visitor ( 133646 )

राज्याच्या शास्वत विकासासाठी पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Raju Tapal January 09, 2023 65

राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रणजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ.अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद योजना,पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पत्रकारांचे काम केवळ बातमी लिहिणे नाही तर राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यातील राज्य शासनाचे काम माध्यमांनी पाहिले आहे. असे त्यांनी सांगितले. माध्यम क्षेत्रात गेल्या तीन - साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत पत्रकारितेत आज झालेला बदल लक्षात घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. असे सांगून या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना ख-या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.

आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाचा वाटा असणारे श्री. मोपलवार, मनरेगा मध्ये विविध सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अप्रतिम मीडियाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक व A v p news संपादक डॉ विश्वासराव आरोटे पत्रकारिता  ( हेमंत जोशी आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते 'अप्रतिम महावक्ता' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिल फळे यांनी केले राष्ट्रगिताने सांगता झाली.

Share This

titwala-news

Advertisement